सलमान खानचा बहुचर्चित ‘सिकंदर’ चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. ३० मार्चला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी ‘सिकंदर’ सज्ज झाला आहे. भाईजानच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. दोन वर्षांनंतर सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सध्या ‘सिकंदर’ची क्रेझ दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, हा चित्रपट ‘शोले’ लेखक व सलमान खानचे वडील सलीम खान यांना कसा वाटला? घ्या जाणून…

ए. आर. मुरुगादॉस यांनी ‘सिकंदर’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ईदचं औचित्य साधून प्रदर्शित होणारा ‘सिकंदर’ चित्रपट पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान, आमिर खानने दिग्दर्शन ए. आर. मुरुगादॉस यांच्याशी खास संवाद साधला. यावेळी सुरुवातीलाच सलमान, आमिर यांनी दिग्दर्शकाला हटके प्रश्न विचारले. त्याच मुलाखतीमध्ये सलीम खान सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी ‘सिकंदर’ चित्रपटाविषयी वक्तव्य केलं.

आमिर खाननं सलीम खान यांना विचारलं की, ‘सिकंदर’ चित्रपट तुम्हाला कसा वाटला? तर सलीम खान म्हणाले, ” ‘सिकंदर’ चित्रपटातील एक-एक सीननंतर तुम्हाला असं वाटतं की, आता पुढे काय होणार? आता काय करणार? अशाच प्रकारे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यश मिळालं, तर हा एक विजय आहे.”

आमिरनं पुढे सलीम खान यांना विचारलं, “सलमानव्यतिरिक्त इतर कलाकारांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निराशा, अवस्थपणा (नर्व्हसनेस) कसा हाताळावा?” त्यावर सलीम खान म्हणाले की, तुम्ही कोणतंही काम करा. तेव्हा सुरुवातीला थोडी थोडी भीती वाटतेच. असं नाही की, फक्त आपल्यालाच असं होतं. हा एक मानवी स्वभाव आहे. प्रत्येकाच्या बाबतीत असं घडतं आणि माझ्या बाबतीतही असंच घडतं, असा विचार करीत राहिल्यास तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ३० मार्चला प्रदर्शित होणारा ‘सिकंदर’ चित्रपट साजिद नाडियाडवालाची निर्मिती आहे. या चित्रपटात सलमान खान पहिल्यांदाच दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानासह पाहायला मिळणार आहे. ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान, रश्मिकाव्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे. तसेच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. २५ मार्चपासून ‘सिकंदर’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून, याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच कोट्यवधींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘सिकंदर’ चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करू शकेल, असं म्हटलं जात आहे.