Karan Arjun Re Release : ‘करण अर्जुन’ या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाले असून यानिमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे . २२ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट पुनःप्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान आणि सलमान खान यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा त्यावेळी खूप गाजला. पण बॉलीवूडच्या या आयकॉनिक सिनेमात सुरुवातीला शाहरुख खानने काम करायला नकार दिला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

शाहरुखने सोडला होता चित्रपट

‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाच्या कलाकारांबाबत बोलताना राकेश रोशन म्हणाले, “सुरुवातीला या चित्रपटात अजय देवगण आणि शाहरुख खानला घेण्यात आलं होतं. शाहरुख या चित्रपटातून बाहेर पडला, कारण त्याला अजय देवगणला जी भूमिका मिळाली ती भूमिका साकारायची होती, त्यामुळे तो बाहेर गेला. अजयनेही हा सिनेमा सोडला. त्याने हा सिनेमा का सोडला हे मला माहीत नाही. मी त्यानंतर सलमान खान आणि आमिर खान यांना चित्रपटात घेतलं. परंतु, नंतर शाहरुख परत आला आणि म्हणाला की, त्याला माझ्याबरोबर काम करायचं आहे. त्याने माझ्यावर विश्वास ठेवत चित्रपटासाठी होकार दिला.”

ROHIT Pawar
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Aamir Khan
“या सीनला लोक…”, ‘दिल’ चित्रपटाच्या वादग्रस्त सीनवरून आमिर खानचे दिग्दर्शकाशी झालेले मतभेद
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत

हेही वाचा…नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा

म्हणून शाहरुखने केला करण अर्जुन सिनेमा

राकेश रोशन पुढे म्हणाले, “शाहरुख परत आला आणि म्हणाला की, त्याला माझ्याबरोबर काम करायचं आहे, कारण मी पहिला निर्माता होतो ज्याने त्याला ‘किंग अंकल’मध्ये अभिनेता म्हणून साइन केलं होतं. तो म्हणाला, ‘मी रात्री झोपू शकलो नाही आणि मला या सिनेमाची कथा खूप आवडली नसली तरी मी तुमच्याबरोबर काम करेन. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.’ त्यानंतर मी आमिरला सांगितलं की, माझ्याकडे शाहरुखच्या पुढील महिन्याच्या तारखा आहेत, त्यामुळे मला त्याच्याबरोबर चित्रपट सुरू करु दे आणि आमिरनेही त्यासाठी होकार दिला.”

शाहरुखने काजोलसाठी शिफारस केली

“शाहरुख खानने काजोलच्या अभिनयाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यामुळेच मी तिला चित्रपटात घेतलं”, असे राकेश रोशन यांनी सांगितले. काजोल, शाहरुख आणि सलमान यांच्या मैत्रीबद्दल राकेश रोशन यांनी सांगितले की, “त्या काळी व्हॅनिटी व्हॅन्स नव्हत्या, सगळे कलाकार एकत्र बसून गप्पा मारत आणि जेवण करत असत. आम्ही एका कुटुंबाप्रमाणे काम करत होतो.”

हेही वाचा…‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”

राकेश रोशन यांनी याच मुलाखतीत सांगितले की, “चित्रपटाची घोषणा करताच माझ्या दोन वितरकांनी साथ सोडली. त्यांच्या मते दोन रोमँटिक हिरोंना ॲक्शन चित्रपटात घेणे योग्य ठरणार नव्हते. पण, मी माझ्या गोष्टीवर ठाम राहिलो. माझ्या टीमपेक्षा प्रेक्षकांनी चित्रपटावर जास्त प्रेम केले, हेच त्याच्या यशाचे कारण आहे.”

‘कायनात’वरून ‘करण अर्जुन’

सुरुवातीला ‘करण अर्जुन’ सिनेमाचे नाव ‘कायनात’ असे ठेवण्यात आले होते, पण नंतर सर्वांनी चर्चा करून ‘करण अर्जुन’ असे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला, जे प्रेक्षकांना अधिक जवळचे वाटले.

हेही वाचा…Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल

पुन्हा दोन सुपरस्टार्स एका चित्रपटात?

आजच्या काळात शाहरुख आणि सलमानसारख्या सुपरस्टार्सला एकत्र आणणे शक्य आहे का, या प्रश्नावर राकेश रोशन म्हणाले, “जर दोघांच्या भूमिकांना समान महत्त्व असलेली पटकथा असेल तर ते नक्कीच होऊ शकतं. मी ‘करण अर्जुन’मध्ये सलमान आणि शाहरुखच्या भूमिकांना सामान महत्त्व असणारी पटकथा लिहिली होती.” २२ नोव्हेंबर २०२४ ला ‘करण अर्जुन’ चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये झळकणार असून, प्रेक्षकांना या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे.

Story img Loader