मुंबई / पुणे : अंतर्गत मूल्यमापनामुळे जवळपास सर्वच विद्यार्थी गेल्या वर्षी उत्तीर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर यंदा पारंपरिक पद्धतीने झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल राज्य मंडळाने शुक्रवारी जाहीर केला. यंदा राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला असून, गेल्या चार वर्षांतील हा नीचांक आहे. त्याचबरोबर ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्यमंडळ) दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात घट झाली असून गेल्यावर्षी ९६. टक्के निकाल जाहीर झाला होता. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होण्याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही गेल्यावर्षीच्या तुलनेत १ लाख ६२ हजारांनी घटली आहे.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
solapur, 1139 crores turnover, onion business in Solapur, during adverse times, onion profit solapur, solapur Agricultural Produce Market Committee, onion in solapur, farmer, marathi news,
प्रतिकूल काळातही सोलापुरात वर्षात कांदा व्यवहारातून ११३९ कोटींची उलाढाल
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी परीक्षा न होता विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात आला होता.१५१ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी राज्यातील १५१ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले असून, त्यातील १०८ विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.

विभागनिहाय निकाल