नाशिक: उष्णतेच्या लाटेत जिल्ह्यात सर्वत्र पाणी टंचाईच्या झळा बसत असताना काही भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नाशिक आणि सिन्नर तालुक्यात चारा टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. या दोन्ही तालुक्यात मे महिनाभर पुरेल इतकाच चारा असल्याने पशुधनासाठी बाहेरून चाऱ्याची व्यवस्था करावी लागणार आहे. मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यास चाऱ्याचे उंचावलेले दरही कमी होतील, अशी अपेक्षा आहे.

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार पशु धनासाठी सात तालुक्यांत जूनअखेरपर्यंत तर, प्रत्येकी एका तालुक्यात जुलै व ऑगस्टपर्यंत आणि दोन तालुक्यांत सप्टेंबरपर्यंत चारा पुरेल, अशी स्थिती आहे. या वर्षी पाणी टंचाईचे संकट सर्वत्र भेडसावत आहे. नाशिक व सिन्नर या तालुक्यात जोडीला चारा टंचाईचा प्रश्न उभा राहिला आहे. नाशिक जिल्ह्यात लहान-मोठे एकूण ५८ हजार ४६६ तर सिन्नर तालुक्यात एक लाख ७९ हजार १८३ इतके पशूधन आहे. नाशिक तालुक्यात चारा उपलब्धतेते फारसे स्त्रोत नाहीत. त्यामुळे या भागास एरवी बाहेरील चाऱ्यावर अवलंबून राहावे लागते.

panchaganga river
पंचगंगा धोका पातळीच्यावर कायम; सांगलीतील ८० कैदी कोल्हापुरात हलवले
Nashik, Bhavali Dam, Igatpuri, landslide, crack collapse, road closure, tourists, Public Works Department, disaster management, traffic, big stones, road clearance, rainfall, nashik news, igatpuri news,
नाशिक : भावली धरणालगतच्या रस्त्यावर दरड कोसळली
urad, soybean, Solapur, rain, Kharif,
सोलापूर : पोषक पाऊसमानामुळे दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात उडीद व सोयाबीनचा पेरा, १७० टक्क्यांवर खरीप पेरण्या
Kolhapur, rain, Kolhapur Collector,
अवघा कोल्हापूर जिल्हा चिंब; जिल्हाधिकाऱ्यांच्या सतर्क राहण्याच्या सूचना
Heavy Rainfall in Thane District, Knee-deep water accumulated near kamwari river house, Severe Flooding in Bhiwandi, Disrupts Life and Commerce, Heavy Rainfall in Bhiwandi, Bhiwandi news, marathi news, latest news,
भिवंडी पावसाचे पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत, कामवारी नदी काठच्या वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले
nashik, Low Rainfall in nashik, low rainfall in Trimbakeshwar, Water Storage Deficit in nashik Dams, Gangapur dam, nashik news,
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा १४ टक्क्यांच्या आत, अधिक धरणांच्या तालुक्यात कमी पाऊस
Due to heavy rains in Ulhas valley water level of Ulhas Bhatsa Bharangi Kalu rivers has increased
उल्हास खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास, भातसा, भारंगी, काळू नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
Kolhapur panchaganga river marathi news
कोल्हापुरात कृषी अधिकारी बांधावर; पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

हेही वाचा : धरणातील पाण्यात उतरताना खबरदारी घ्या…नाशिक जिल्ह्यात आठवडाभरात १० जणांचा मृत्यू

सिन्नर तालुक्यात चारा टंचाईमुळे काही पशुपालकांना जिथे चाऱ्याची व्यवस्था होईल, तिथे स्थलांतरीत करावे लागत आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यास नैसर्गिकरित्या चारा उपलब्ध होईल, अशी या विभागाला आशा आहे. १० जूनपर्यंत पाऊस न झाल्यास पशू संवर्धन विभागाकडून टंचाई भासणाऱ्या भागात चाऱ्याचे नियोजन केले जाणार असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यातील चारा शेजारील जिल्ह्यात नेण्यास प्रतिबंध आहे. चाऱ्याचे दरही सध्या गगनाला भिडल्याचे पशूपालक सांगतात. जिल्ह्याच्या हद्दीत उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांमध्ये नेण्यास प्रतिबंध आहे.

पशूधन, चाऱ्याची गरज कशी ?

जिल्ह्यात दोन लाख २२ हजार २६ लहान, आठ लाख ६६ हजार २८४ मोठी जनावरे तर आठ लाख ५२ हार ९५५ शेळ्या-मेंढ्या असे एकूण १९ लाख ४१ हजार २६५ पशूधन आहे. त्यांना दर महिन्याला साधारणत: एक लाख ८६ हजार १५० मेट्रिक टन चारा लागतो. तर महिन्याकाठी तीन कोटी ६० लाख ८८ हजार चारा लिटर त्यांची पाण्याची गरज आहे.

हेही वाचा : नाशिक विभागातील मान्सूनपूर्व तयारीचा आज मुख्यमंत्र्यांकडून आढावा

तालुकानिहाय चारा स्थिती

जिल्ह्यात मालेगाव, कळवण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, निफाड, येवला व चांदवड या तालुक्यात जूनअखेरपर्यंत चाऱ्याची उपलब्धता आहे. पेठमध्ये जुलैअखेरपर्यंत, बागलाण व इगतपुरी ऑगस्ट तर देवळा, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत चारा पुरेल अशी स्थिती असल्याचे अहवालात म्हटले आहे. नाशिक व सिन्नर चाऱ्याची स्थिती चिंताजनक आहे. या दोन्ही ठिकाणी मेपर्यंत पुरेल इतकाच चारा आहे.