ओडिशामध्ये झालेला तीन ट्रेन्सचा भीषण अपघात हा देशातला मागील वीस वर्षांमधला सर्वात मोठा अपघात आहे. या अपघातात २८८ प्रवासी ठार झाले आहेत तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघाताची सीबीआय चौकशीचीही मागणी होते आहे. तसंच यावरुन आरोप-प्रत्यारोपांचंही राजकारण होऊ लागलं आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुजरातला सगळं महत्त्व दिलं जातं आहे असं म्हणत टीका केली आहे.

काय म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी?

“किती लाजिरवाणी गोष्ट आहे की, रेल्वे ट्रॅक, सिग्नल आणि इतर साधनांच्या आधुनिकीकरणासाठी कुठलाही फंड नाही. मात्र अहमदाबाद मुंबई सुपर फास्ट ट्रेनसाठी १ लाख कोटी उसने घेतले जात आहेत. गुजरातला सगळं महत्त्व आहे, बाकी काहीही नाही.” या आशयाचं ट्वीट करत प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

Narendra Modi and prakash ambedkar
“भारतीय मुसलमान घुसखोर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची टीका; काँग्रेसलाही केलं लक्ष्य!
dr babasaheb ambedkar jayanti, 14 april, Mumbai Railways, Conduct Daytime Megablock, Central and Western Lines, Expect Disruptions, travelers, central railway, western railway, mumbai local, 14 april megablock, babasaheb ambedkar jayanti megablock, marathi news, railway news, mumbai local news
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी रेल्वे मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन
vanchit bahujan aghadi marathi news, prakash ambedkar party symbol marathi news
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या ‘कुकर’चे ‘प्रेशर’ कुणावर? ईश्वरचिठ्ठीवर लागला चिन्हाचा निकाल…

शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ओडिशामध्ये झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघातामध्ये आत्तापर्यंत २८८ प्रवाशांचा बळी गेला आहे. जखमींवर रुग्णालयांत उपचार चालू आहेत. एकीकडे हा अपघात कसा झाला? त्यासाठी कोण जबाबदार आहे? तांत्रिक बिघाड झाला होता का? यासंदर्भात सविस्तर तपास केला जातो आहे. आज अपघातानंतर सुमारे ५० तासानंतर या मार्गावरुन पहिली मालगाडी रवाना झाली.

सामनातूनही मोदी सरकारवर टीका

“मोदी सरकारने रेल्वे अपघातविरोधी ‘संरक्षण कवचा’च्या टिऱ्या बडविल्या होत्या. मात्र बालासोरच्या रेल्वे अपघाताने त्याच्या ठिकऱ्या उडविल्या आहेत. २८८ प्रवाशांचा बळी घेणारा आणि ९००च्या वर प्रवाशांना जखमी करणारा हा अपघात कसा घडला याची प्राथमिक कारणे आता समोर येत आहेत. पुढील तपासात आणखी तपशील समोर येईल, पण शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघाताने आजही देशातील रेल्वे प्रवास असुरक्षित असून रेल्वे प्रवाशांचे जीवन क्षणभंगूर, बेभरोसे असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे”, अशी भूमिका ठाकरे गटाकडून घेण्यात आली आहे