Lok Sabha Election 2024 Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात भाजपासाठी भावनिक वातावरण आहे असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा आहे त्यामुळे ते औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांबरोबर गेले अशी टीका केली. तसंच शरद पवार यांना या वयात घर सांभाळता आलं नाही असं म्हटलं आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा जवळ आला आहे. आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत त्याला प्रत्युत्तरंही दिली जात आहेत. उद्धव ठाकरेंनी सांगलीतल्या सभेतही हुकूमशाहीचं भूत मानगुटीवर बसेल असं म्हटलं आहे. या आणि इतर घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून-
Marathi News Today, 03 May 2024 "महाराष्ट्रात भाजपासाठी भावनिक वातावरण", पंतप्रधान मोदींचा दावा, यासह महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई : १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाने लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावावा यादृष्टीने स्वीप उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून त्याकरिता विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये ज्या ठिकाणी लोक जास्त संख्येने एकत्र येतात अशा समारंभ, उत्सव या कार्यक्रमांच्या ठिकाणी जाऊन मतदान करण्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे तसेच मतदान शपथ घेऊन मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. ईटीसी केंद्रातील विशेष विद्यार्थी व व्यक्तींनी रॅलीद्वारे वाशी रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती केली आहे.

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील ए. बी. नायर मार्गावरील जुहू टपाल कार्यालयाजवळ शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास गॅसगळतीमुळे काही दुकानांना आग लागली. या दुर्घटनेत एकूण चारजण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई : पूर्व उपनगर, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, मिरा रोड, भाईंदर या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी शीव रुग्णालयात येतात. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. असे असताना रुग्णांना अद्ययावत आरोग्य सुविधा पुरविण्याऐवजी रुग्णालयाची कोट्यवधीची जमीन पुनर्विकासाच्या नावाखाली खासगी विकासकाला देण्यात आली आहे. रुग्णालयाची हक्काची जमीन विकासकाला देऊ नये या मागणीसाठी शीव रुग्णालय बचाव समितीतर्फे ४ मे रोजी जागरुकता आंदोलन करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपले रुग्णालय वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
नागपूर : वन्यप्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या चिमुकल्या पिल्लांसाठी भारतातील पहिले स्वतंत्र उपचार केंद्र नागपुरात सुरू झाले आहे. या केंद्रात त्यांच्यावर उपचार तर केलेच जातात सोबतच मायेची ऊब देखील दिली जाते. वन्यप्राण्यांवर उपचार, उपचारानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करणारे भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्र सुमारे नऊ वर्षांपूर्वी नागपुरात सुरू झाले.
बजाज ऑटोकडून सीएनजी दुचाकी सादर केली जाणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती.
नागपूर : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडिबीटीच्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुळशी येथील जाहीर सभेत आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये यंदा "धनशक्ती"चा वापर होत असल्याचा आरोप केला होता.
उन्हाळ्याची चाहूल लागताच एपीएमसी फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांच्या हंगामाला सुरुवात होत असते.
संतप्त झालेल्या पालक संघटनेचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कोणतेही काम धडाक्यात करतात. विश्रांती हा शब्दच त्यांच्या शब्दकोषात नाही. अतिदगदग त्यांच्या प्रकृतीला सहन होत नाही तरी ते थांबायला तयार नाहीत.
गडचिरोली : १ मे रोजी राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उरणच्या निसर्गप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
गडचिरोली : १ मे रोजी राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आरोपींनी कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले (वय ७६) यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील दागिने लुटले होते. मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
धक्कादायक बाब म्हणजे या टोळीत अमरावती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन अधिकारी आणि एका दलालाचा समावेश आहे.
सासू-सासऱ्यांच्या सांगण्यावरुन पत्नी नांदायला येत नसल्याने नवनाथ चिडला होता.
मुंबई : महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत असलेल्या काही अनुदानित तंत्रनिकेतनातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन अद्यापही देण्यात आलेले नाही. परिणामी, या सर्वांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि कर्जाचे हप्ते भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सर्वेक्षणानंतर एकूण ५३५ इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६४ नुसार धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांच्यामधील सत्तासंघर्षाला नव्याने धार चढल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले.
हेमंत गोडसे यांची संपत्ती पाच वर्षात केवळ सुमारे दोन कोटींनी वाढून ती १६ कोटींवर पोहोचली आहे.
मुंबई : कुणबी नोंद असलेल्या राज्यातील मराठ्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला आव्हान देणाऱ्या ओबीसी समाजाच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले.
मुंबई : दिवंगत कामगार नेते शरद राव यांचे पुत्र कामगार नेते शशांक राव यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राव यांनी हा पक्षप्रवेश केला.
उरण : रेल्वे स्थानकानजीक बराल कुटुंबाला चिरडणाऱ्या जय घरतला अखेर उरण पोलिसांनी अटक केली आहे. त्याला उरणच्या न्यायालयात दाखल केले असता ६ मेपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. पनवेल सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्याने उच्च न्यायालयातही जामीन अर्ज मागे घेण्याची नामुष्की आणि विविध सामाजिक संस्थांच्या पोलिसांवर वाढत्या दबावानंतर उरणमधील अत्यंत संवेदनशील बनलेल्या बराल पती-पत्नी अपघात प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी उरण परिसरातून अटक केली आहे.
न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी डॉ. विशाल नेहुल यांनी दिली. उरण रेल्वे स्थानकासमोर पवित्रा, रश्मिता बराल हे दाम्पत्य आणि त्यांची मुलगी परी बराल यांच्या स्कूटीला क्रेटा कारने चिरडून आरोपी जय दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला होता.
वर्धा : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे धामधूम व आरोप प्रत्यारोपात आटोपले. नेत्यांचे भाषण तसेच गर्दीच्या सभा यामुळे रंगत आली. भाजप नेत्यांनी तर कसलीच कसर नं ठेवता मैदान गाजविले.
वधूवरांना शुभाशीर्वाद देण्याच्या निमित्ताने पाचगणीत राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीतील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली .
आत्महत्या करणारी युवती आणि आरोपी हे एकमेकांच्या परिचित होते. त्यातून आरोपीचे एकतर्फी युवतीवर प्रेम होते.
मुंबई : हाजी अली येथे असलेल्या डबेवाला कामगाराचा पुतळा पत्रे लावून झाकण्यात आला असून हा पुतळा अन्यत्र हलविण्यात येणार असल्याची भीती डबेवाल्यांच्या संघटनेने व्यक्त केली. या वाहतूक बेटाची देखभाल करण्यासाठी नव्या कंपनीची नेमणूक करण्यात आली असून या कंपनीला हा पुतळा तेथे नकोसा झाला आहे, असा आरोप डबेवाल्यांच्या संघटनेने केला आहे.
ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के हे शुक्रवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निघाले आहे.
अकोला : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अकोला जिल्ह्यात ‘आरटीई’च्या जागांच्या तुलनेत केवळ ४.८६ टक्के अर्ज दाखल झाले आहेत.
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची कौटुंबिक मालमत्ता पाच वर्षात दुप्पट झाली आहे.
विरोधकांकडून होणाऱ्या संविधान बदलण्याच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (PC : BJP/X)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात भाजपासाठी भावनिक वातावरण आहे असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा आहे त्यामुळे ते औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांबरोबर गेले अशी टीका केली. तसंच शरद पवार यांना या वयात घर सांभाळता आलं नाही असं म्हटलं आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे.