Mumbai News Today : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन अद्यापही सुरू आहे. गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेलं मनोज जरांगे पाटलांनी उपोषण काल (१४ सप्टेंबर) मागे घेतलं. यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवली सराटी येथे उपोषणस्थळी पोहोचले होते. दरम्यान, जम्मू काश्मिरातील दहशतवादी हल्ला, भाजपा कार्यालयात झालेली पुष्पउधळण, सनातन धर्म आदी मुद्द्यांवरून राज्यातील वातावरण तापलं आहे. तर, दुसरीकडे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगितलं जातंय. यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा.
Maharashtra News Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
पुणे : राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पद भरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात पद भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंत्राटी पदभरतीचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले.
बुलढाणा: जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा होतो. मात्र मेहकरात ट्रॅक्टर पोळ्याची संकल्पना आता चांगलीच रुळली आहे. यंदाच्या पोळ्यातही ही अभिनव परंपरा कायम राहिली.बैलांचे घटते प्रमाण, त्यामुळे शेतीचे झालेले यांत्रिकीकरण, बैला ऐवजी ट्रॅक्टरने होणारी कामे यामुळे मेहकर मध्ये आता आधुनिक पद्धतीने पोळा भरतो.
थायरॉईडच्या ग्रंथींमुळे घशाला सूज आल्याने खाण्या-पिण्यास त्रास होणार्या ३२ वर्षीय महिलेवर ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ (एमव्हीए) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयात अवघ्या १५ मिनिटात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
गोंदिया: जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून अधून मधून पाऊस पडत होता. मात्र गुरुवारी सायंकाळी ४ बैलपोळा एन भरात असताना सुरू झालेला पाऊस रात्र भर बरसला आणि शुक्रवारी पहाटे पासून तर चक्क मुसळधार पावसाला सुरुवात झाली ती सकाळी ११ वाजता पर्यंत सातत्याने वाढत तर काहीशी ओसरत पाऊस सुरूच राहिला.
गेल्यावर्षी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानंतर वाद झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर दादर पोलीस ठाण्याच्या आवारात गोळीबार झाला होता.
नवी मुंबई: उन्हाळ्यात महाग असणाऱ्या फळभाज्या पावसाळा सुरू होताच स्वस्त होण्यास सुरुवात होत असते परंतु पावसाळ्यात पालेभाज्यांचे भाव वधारतात.
प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करताना एक व्यक्ती पाय घसरून गुरुवारी विक्रोळीमधील नाल्यात वाहून गेली.
स्टॉल न मिळाल्याने बाबुलाल आणि त्याच्या साथीदारांनी कात्रज आणि वारजे परिसरातून दोन महिलांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले होते.
https://x.com/Central_Railway/status/1702627234157388033?s=20
दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेसला शुक्रवारपासून तृतीय श्रेणीचे दोन वातानुकूलित डबे जोडण्यात आले.
सेलू तालुका येथील प्रयोगशील शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांना कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचे पुरस्कार सुद्धा मिळाले आहे.
नाशिक: जिल्ह्यातील गुजरातच्या सीमावर्ती भागालगत असलेल्या जंगलांमध्ये पुन्हा लाकूड चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्या जंगलातील खैरांवर सर्रासपणे कटर फिरवित असल्याने वनविभागही सतर्क झाला आहे.
https://x.com/VijayWadettiwar/status/1702610701083361446?s=20
सीएसएमटीवरून दररोज ९० लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. मात्र फलाट क्रमांक १० ते १४ ची लांबी कमी असल्याने येथे २४ डब्यांची रेल्वेगाडी उभी राहू शकत नाही.
Marbat Procession in nagpur नागपूर : ईडा पिडा, रोग राई, जादू टोना, संकटे घेऊन जा गे मारबत…. अशा घोषणा देत भर पावसात नागपुरात ढोल ताशाच्या गजरात सकाळी मारबत बडग्या मिरवणूक निघाली. लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. मारबत बघण्यासाठी लाखोंची गर्दी रस्त्यांवर उतरली होती.
नवी मुंबई: वाशी आणि तुर्भे या दोन उपनगरांच्या वेशीवर असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या कांदा-बटाटा बाजाराच्या पुनर्वसन प्रकल्पात एक हजार चौरस फुटाचे गाळे मिळावेत यासाठी येथील व्यापाऱ्यांनी आग्रह धरला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आले असून अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी यांनी दुबईमधील लग्नात सादरीकरण केले होते.
येथील औद्योगिक विभागातील विको नाक्याला चहुबाजुने हातगाड्यांचा विळखा असतो. या हातगाडयांमुळे विविध प्रांतामधून कंपन्यांच्यामध्ये कच्चा, पक्का माल घेऊन आलेले मालवाहू ट्रक जाण्यासाठी प्रशस्त रस्ता नसल्याने वाहने अडकून पडतात. सविस्तर वाचा…
दीर्घ काळाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात दमदार पावसाचे पुनरागमन झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी-नाले दुथडी भरून तर ओढे, तलाव ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागले आहे. सविस्तर वाचा…
उरण: देशातील शेतकऱ्यांना मोबदला म्हणून साडेबारा टक्के विकसित भूखंडाचे तत्व प्रस्तापित करणाऱ्या माजी खासदार दि. बा. पाटील यांचे जासई गावच या योजनेपासून वंचित राहिले आहेत.
नागपूर : उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी ७२ वसतिगृहांच्या साहित्य खरेदीचा आणि वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आधार योजनेचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केल्याने या दोन्ही बाबतीत चालू शैक्षणिक सत्रात लाभ मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.
भाईंदर: भाईंदरमध्ये फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडकी. तपन बिस्वास( ४६)असे या मयत खेळाडूचे नाव आहे.
उरण: शहरातील पेन्शनर्स पार्क येथे रात्रीच्या वेळी उभ्या करण्यात येणाऱ्या एन एम एम टी बसेसचे दरवाजे उघडे राहत असल्याने या बस मध्ये मोकाट श्वान बस मधील असनांवर बसत आहेत.
वसई: विरार ते चर्चगेट चालत्या लोकल मध्ये एका तरुणाने जीवघेणी स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित होऊ लागली आहे.
नागपूर : महामेट्रोचा प्रकल्प उभारण्याइतकेच प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याचे दीर्घकाळापर्यंत संचालन करणे हे आव्हानात्मक काम आहे. सध्या मेट्रोतून दररोज ८० हजार प्रवासी प्रवास करीत आहे. मेट्रोची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्यात आम्ही कमी पडलो, ही संख्या दोन लाखांवर नेण्याचे आमचे प्रयत्न आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांनी सांगितले.
२०१० साली मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर कामाला सुरुवात झाली होती. पण २०२३ सरायला आले तरी महामार्गाचे काम मार्गी लागलेले नाही. दुसऱ्या टप्प्यातील कामाची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करत असले तरी कामाची गती लक्षात घेता यंदाही चाकरमान्यांचा कोकण प्रवास खडतर राहण्याची शक्यता अधिक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही याविरोधात आवाज उठवला होता. आज त्यांनी ग्राऊंड रिपोर्टच सादर केला आहे.
पाली येथील ‘पापा पन्चो दा ढाबा’ या हॉटेलमध्ये एका व्यक्तीला जेवणामध्ये मृत उंदीर सापडल्यामुळे खळबळ उडाली होती.
गडचिरोली: राज्याच्या शेवटच्या टोकावरील मागास व दुर्गम गडचिरोलीत झालेली पदस्थापना शिक्षा समजून अनेक अधिकारी रुजू होत नाहीत किंवा पदस्थापना बदलून घेतात. जिल्ह्यात पदस्थापना मिळालेले तीन तहसीलदार अडीच महिन्यांपासून रुजू झाले नव्हते.
पत्नीशी संपर्क साधू नये, तसेच तिच्या घरात प्रवेश करु नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पतीकडून चारित्र्याचा संशय घेऊन छळ करण्यात येत होता.
नागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करण्यासाठी नागपूर विभागाने प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या ई-पंचनामा प्रयोगामुळे दहा दिवसांत माहिती संकलन शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट् न्यूज लाइव्ह
Maharashtra Live News Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा