Maharashtra Politics Today : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्थेची घडी, लोकप्रतिनिधींवरील हल्ले आणि हत्यांमुळे विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. तसंच, सत्ताधाऱ्यांकडून जातीय आणि धार्मिक राजकारण केलं जात असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. तसंच, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले असून आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे. तर, सरकारने काढलेल्या अधिसूचनेचा कायदा बनवण्यासाठी राज्यात लवकरच विशेष अधिवेशन घेतले जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच, राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते आता कोणत्या पक्षात जातात हे पाहावं लागणार आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, हवामान अंदाज याबाबतचे वृत्त पाहुयात.