Maharashtra News Highlights: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. तसेच पुण्यातील गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून शस्त्रपरवाना मंजूर करण्यात आल्याच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत २ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करावा आणि २०१४ पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी या मागण्यांसाठी आज नागपूर येथे ओबीसी समाजाकडून मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लागच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Mumbai News Live Updates : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
कोल्हापूरमधील बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त; एक कोटीच्या नकली नोटा जप्त
मुंबई हातची गेली, की मग हंबरडा फोडा ! एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
पंढरपुरातील मंडल अधिकारी लाच घेताना जेरबंद
उद्धव ठाकरे यांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
पन्हाळ्यात बिबट्याच्या बछड्याचा हल्ल्याचा प्रयत्न; दोघेजण जखमी, वन विभागाकडून ड्रोनद्वारे शोध मोहीम
Pune Accident: हिंजवडीत अवजड वाहनाचा आणखी एक बळी; दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; प्रवेश बंदीचे उल्लंघन
पिंपरी : पदपथांवरील हातगाड्यांअगोदर मोटारींवर कारवाई करा; नवनियुक्त आयुक्तांचे निर्देश
महायुती निवडणूका कशा लढणार.. एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छेद ?
याआधी मराठा राजकारणी सर्वांना विश्वासात घेत - छगन भुजबळ यांची नाराजी
यवतमाळ : आदिवासी आरक्षण बचावासाठी महामोर्चा; अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा व धनगर समाजाला…
घायवळ प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण
Pune Crime News: पिंपरी : आयटीनगरी हिंजवडीतील कंपनीची फसवणूक
ठाण्यात भाजी आणणाऱ्यालाही अंगरक्षक; राजन विचारे यांची शिंदे गटावर टीका
कल्याणमधील पालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्राची पडझड; पडझडीमुळे श्वानांचे हाल
राजन विचारे संतापले म्हणाले… बोगस नावे टाकणाऱ्या अधिकाऱ्याला आता सोडणार नाही, घराबाहेर जाऊन…
बाळासाहेबांची ओरिजनल फौज ठाण्याच्या रस्त्यावर उतरणार; अविनाश जाधव यांचा इशारा
येत्या १७ ऑक्टोबर रोजी बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसीचा महा एल्गार मेळावा होणार आहे. यावेळी मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांना देखील निमंत्रण दिल्याची माहिती मेळाव्याचे आयोजक अॅड. सुभाष राऊत यांनी दिली. २ सप्टेंबर रोजी शासनाने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे, तो रद्द करण्याच्या मागणीसाठी हा मेळावा होणार असल्याचे देखील राऊत यांनी सांगितले. दरम्यान, बीड मधील यापूर्वीचा मेळावा रद्द झाला होता. त्यावेळी जरांगे पाटील यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांनी हा मेळावा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्याचा समाचार घेत सुभाष राऊत यांनी मेळावा उधळण्याची भाषा कोणी करू नये अन्यथा तुमचे काय धंदे आहेत ते आम्हाला शोधावे लागतील. राज्यभरात जे बॅनर लावले जातात त्यासाठी पैसा कुठून येतो, कोणत्या एजन्सीवर काय कामे घेतली आहेत हे देखील आम्हाला समोर आणावे लागेल असा इशारा सुभाष राऊत यांनी काळकुटे यांना दिला आहे.
महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या १७ गुन्हेगारांना कल्याण पोलिसांकडून मोक्का; कल्याणमधील खडकपाडा पोलिसांची मोठी कारवाई
ठाण्यात अमित ठाकरे आले आणि दुखण्यावर औषध घेऊन गेले….
अकोला : ११ गुन्ह्यांतील तब्बल २२६ किलो अंमली पदार्थ नष्ट
डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे अधिकृत युपीआय हँडल; सहकारी बँकिंगच्या डिजिटायझेशनमधील एक महत्वाचा टप्पा पार
ठाण्यात शिंदेंना ठाकरे बंधूंचे आव्हान? महापालिकेवर ठाकरे गट आणि मनसेचा एकत्रित धडक मोर्चा; आमदार जितेंद्र आव्हाड देखील सहभागी होण्याची शक्यता
तर, मुंबई, पुणे, ठाणे जाम होणार? वडेट्टीवारांचा इशारा, ओबीसी मोर्चात फडणवीसांवर टीका
‘वनतारा’तून ‘ओरांगुटान’च्या सुटकेचा मार्ग मोकळा, लवकरच इंडोनेशियात परतणार
कल्याणमध्ये नागरिकांचे चोरी झालेले मोबाईल पोलिसांकडून परत
ममता की प्रणयाराधन! वाघीण पेचात. तर ५ वाघ आणि गावकरी संकटात म्हणून एनएनटीआर दाखल
महिला पोलिसाची आत्महत्या नव्हे, ‘हत्या’ ? मोबाईल संभाषण उघड झाल्यानंतर लिव्ह-इन सहकाऱ्याला अटक
"अनिल परब साहेब, रवींद्र धंगेकर , सुषमाताई अंधारे यांना पोलीस संरक्षण द्या', रोहित पवारांची मागणी
"राज्यभरात चर्चेस असलेली गुंडांची प्रकरणं अतिशय गंभीर असून या प्रकरणात भूमिका मांडणारे अनिल परब साहेब, रवींद्र धंगेकर , सुषमाताई अंधारे यांना सरकारने तत्काळ पोलीस संरक्षण द्यावे. यापैकी कुणाच्या केसाला जरी धक्का लागला तर सरकार जबाबदार असेल. म्होरके जरी अंडरग्राउंड असले तरी त्यांच्या गँग इतर सदस्यांच्या माध्यमातून नेहमीच सक्रिय असतात आणि विशेष म्हणजे काही गँगला तर मोठ्या व्यक्तींचे वरदहस्त आहेत, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ही प्रकरण अतिशय गंभीर असून पोलिसांनी डोळेझाक करू नये. नेपाळसारख्या बॉर्डर तर देशाबाहेर पळून गेलेल्या गुन्हेगारांसाठी ‘आवो जावो घर तुम्हारा’ असल्यासारख्या झाल्या असून पोलिसांनी अशा बॉर्डर्सवर विशेष लक्ष ठेवायला हवे" अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केली आहे.,

 महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
 महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...