बुलढाणा: गारपीट, वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत भरपाईबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. आपण यावर हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचेही त्यानी सांगितले.

सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का व अन्य गावातील, पीक, शेडनेट, भाजीपाला नुकसानीची अंबादास दानवे यांनी आज बुधवारी पाहणी केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, पदाधिकारी, शिवसैनिक सोबत होते.

Thane, Badlapur, Shambhuraj Desai,Investigation into Violent Badlapur Railway Protest, railway protest,
बदलापुरातील रेल रोको आंदोलनाची चौकशी केली जाणार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Balasaheb Shivarkar demanded that the ladaki bahin scheme should be implemented for all
‘लाडकी बहीण’ बाबत माजी राज्यमंत्र्यांची मोठी मागणी म्हणाले…!
The Central Election Commission ordered the state government to transfer the officers of Revenue Police Excise Municipalities Corporations politics
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, निवडणूक आयोगाचे आदेश; मंगळवारपर्यंत मुदत
Supriya Sule, tuljapur, ladki bahin yojana
लोकसभेच्या अपयशामुळेच लाडकी बहीण योजना, शिवस्वराज्य यात्रेत सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका
mla mahesh shinde controversial remark on Ladki Bahin Yojana,
सातारा : विरोधात काम केल्यास निवडणुकीनंतर ‘लाडकी बहीण’मधून नावे वगळणार; आमदार महेश शिंदेंचे वादग्रस्त वक्तव्य
vandana chavan eknath shinde marathi news
उद्धव ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयांचा फेरविचार करा; मुख्यमंत्र्यांकडे कोणी केली मागणी?
raosaheb danve Active in jalna
पराभवानंतर रावसाहेब दानवे पुन्हा जालन्यात बांधणीसाठी मैदानात

हेही वाचा : शिक्षणाचा बाजार! वाशीम जिल्ह्यात अनधिकृत शाळा, विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतले; शिक्षण विभागाने…

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून शासनामार्फत तत्काळ मदत होणे आवश्यक आहे. आज होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत या नुकसानीबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी दानवे यांनी केली. राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही यावेळी दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली.