करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगातील साऱ्या यंत्रणा झगडत असल्या तरीही झपाटय़ाने होत असलेली नव्या रुग्णांची वाढ ही चिंताजनक ठरत आहे. देशभरात २४ तासांमध्ये ८९६ नव्या रुग्णांची भर पडली असून ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्युसंख्या ११० झाली असून जगातील बळींची संख्या १ लाखांवर गेली आहे. देशभरात शुक्रवारी सर्वाधिक नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत २१८ नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील बाधितांची संख्या ९९३ झाली असून, दादरमधील शुश्रूषा रुग्णालयातील दोन परिचारिकांना विषाणूची बाधा झाली. धारावीतील रुग्णांची संख्या वाढून २८ झाली. इंग्रजी वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या एका पत्रकाराला देखील करोनाची लागण झाली. राज्यात शुक्रवारी करोनाच्या २१० नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील करोनाबाधितांची संख्या १५७४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण १८८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात ११७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत,