Maharashtra Politics News Updates: लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीमध्ये मनसेच्या समावेशाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. राज ठाकरे व अमित शाह यांच्यातील बैठकीमुळे या चर्चेला अधिकच खतपाणी घातलं गेलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या समावेशावरील प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर व प्रणिती शिंदे यांच्यात सोलापूरच्या जागेवरून अहमहमिका निर्माण झाल्याचं दिसू लागलं आहे.
Maharashtra Live News Updates 20 March 2024: लोकसभा निवडणुकांसंदर्भातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी उमेदवारीचा दावा केला असला तरी हातकणंगले पाठोपाठ शिरोळ तालुक्यातून उमेदवारीला नव्याने आव्हान दिले जात आहे.
मुंबई : व्यवसायाने डॉक्टर असलेल्या ४३ वर्षीय महिलेने अटल सेतूवरून उडी मारली. ही महिला दादर येथील रहिवासी असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या तपासणीतून हा प्रकार उघडकीस आला. नवी मुंबई पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.
धुळे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची जळगाव येथे बदली झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनिता सोनवणे व ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी जिल्हा परिषद आवारात पेढे वाटले.
पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात मंगळवारपासून अचानक पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (एमजेपी) जलवाहिनी अचानक फुटल्याने दुरुस्तीच्या कामासाठी हा बंद पाळण्यात आला होता.
वर्धेची जागा काँग्रेसनेच लढावी म्हणून शेवटच्या टप्प्यात प्रयत्न झाले. मात्र आता ही जागा राष्ट्रवादी पवार गटाकडेच जाणार यावर अखेरचे शिक्कामोर्तब झाले आहे. सविस्तर वाचा…
सिंदखेडराजा, जि. बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उघडपणे गुजरातबद्धल विशेष ममत्व दाखवून राज्याराज्यांत शत्रुत्वाच्या भिंती उभे करीत असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपच्या ‘अब की बार चारसो पार’ घोषणेची खिल्ली उडवून ‘अब की बार भाजप तडीपार’ असा नारा दिला. सविस्तर वाचा…
वर्धा आणि अकोला येथील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे बुधवारी दुपारी येथील बेलोरा विमानतळावर आगमन झाले. सविस्तर वाचा…
लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारमध्ये सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, माजी खासदार नरेश पुगलिया, शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप, श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष ॲड.पारोमिता गोस्वामी नेमकी काय भूमिका घेतात, कुणाच्या मागे पाठबळ उभे करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा…
नवी मुंबईतील वाशी स्टेशन परिसरात अरुणाचल भवन नावाच्या इमारतीतील ८ व्या माळ्यावर निग्रो बिझनेस नावाच्या कंपनीचे कार्यालय आहे. याच ठिकाणी १५ तारखेला संध्याकाळी सातच्या सुमारास एक व्यक्ती आला. सविस्तर वाचा…
उरण : सध्या अनेक ठिकाणी माती, कचरा आणि राडारोडा टाकून खारफुटी (कांदळवन) मारली जात आहे. याकडे सिडको आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणवाद्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विकासकांच्या फायद्यासाठी अनेक ठिकाणच्या खारफुटीवर मातीचा, कचऱ्याचा भराव टाकून ती मारली किंवा नष्ट केली जात आहे.
नवेल : सिडको महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा भार विजय सिंघल यांनी घेतल्यावर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आणि उलवे परिसरात राडारोडा टाकणाऱ्यांविरोधातील जोरदार मोहीम सिडकोच्या दक्षता विभागाने पुन्हा सुरु केली आहे.
धुळे – आलु अर्जुनचा पुष्पा चित्रपट त्याच्या वेगवान कथानक, गाणी, हाणामारी आणि त्यात वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या कल्पनांमुळे चांगलाच गाजला. या चित्रपटातील कल्पनांचा वापर अनेक जणांकडून प्रत्यक्षातही केला जात आहे. धुळे जिल्ह्यात पोलिसांनी एका मालमोटारीची तपासणी केली असता पुष्पातील आयडियाचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले. ते पाहून पोलीसही चक्रावले.
पुणे : ‘विद्यापीठे, महाविद्यालयांनी गुणवत्ता, नवसंशोधनात सुधारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यापीठे, महाविद्यालये मागे पडतील,’ असा इशारा राज्यपाल रमेश बैस यांनी दिला.
मुंबई : मलबार हिल जलाशयाचा अंतिम अहवाल सादर होऊन १० दिवस लोटले तरी याविषयी अद्याप पालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. या जलाशयाचा प्रस्तावित पुनर्बांधणी प्रकल्प तातडीने सुरू करून कमीत कमी वेळेत पूर्ण करावा, अशी मागणी माजी अभियंत्याची संघटना असलेल्या मुंबई विकास समितीने केली आहे. तर या जलाशयाच्या पुनर्बांधणीला विरोध करण्यासाठी पर्यावरणवाद्यांची बुधवारी (२० मार्च) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी खुली चर्चा होईल.
नवी मुंबई : सीवूड्स विभागात सेक्टर ४६ येथील सोसायटीमधील इमारत क्रमांक ७ च्या टाकीखालील टेरेसचा भाग मोठ्या प्रमाणात कोसळला.
पिंपरी : भोसरीमधील उजगरे आणि वाकडमधील आहिरराव टोळ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.
मुंबई : अवघ्या मुंबापुरीला हादरवणाऱ्या गोकुळ निवास अग्नितांडवाला मे २०२५ मध्ये १० वर्षे पूर्ण होत असून या दुर्घटनेतून बोध घेऊन केलेल्या उपाययोजना केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरली आहे.
पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात तरुणीने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणीचा उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी महाविद्यालयातील तरुणीसह, कॅन्टीनमधील एकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पुणे : यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी देशात एकूण ३३० लाख टनांचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. पण सततच्या मान्सुनोत्तर पावसामुळे ऊस उत्पादनासह साखर उतारा आणि साखर उत्पादनात वाढ झाली आहे.
भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज निघणार असून भंडारा-गोंदिया मतदार संघात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख येऊन ठेपली मात्र उमेदवारचाच पत्ता नाही, अशी गत झाली आहे.
नागपूर : उपराजधानीतील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील बर्ड फ्लू संक्रमणाबाबतची पाहणी व सूक्ष्म अभ्यास करून अखेर केंद्रीय पथक सोमवारी दिल्लीला रवाना झाले. पथकाच्या सूचनेवरून ३ किलोमीटरपर्यंत महापालिकेकडून झालेल्या बर्ड फ्लूच्या सर्वेक्षणात बरेच करोनाग्रस्त आढळल्याने चिंता वाढली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासह विविध पदांचे कामकाज अतिरिक्त कार्यभाराने करावे लागत आहे. त्यातही ११ प्राध्यापकांकडे चाळीस पदांची जबाबदारी असून, चार प्राध्यापकांकडे पाचपेक्षा जास्त पदे आहेत.
नांदेड : १९९०च्या दशकात एकाचवेळी राज्यमंत्री झालेले अशोक चव्हाण आणि डॉ. माधव किन्हाळकर हे बालमित्र गेल्या दशकांतील राजकीय कटुता आणि त्यातून झालेल्या व महाराष्ट्रभर गाजलेल्या कायदेशीर लढाईनंतर तब्बल २५ वर्षांनी ‘राम-राम’ म्हणत एकाच पक्षात एका व्यासपीठावर आले आहेत.
मुंबई : स्मार्ट प्रीपेड वीज मीटरच्या सक्तीच्या वापराला जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तसेच, प्रीपेड की पोस्टपेड वीज मीटरबाबतचा पर्याय निवडण्याचा अधिकार ग्राहकांना देण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
बुलढाणा : रस्त्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करून दहन केल्याप्रकरणी धोडप ( तालुका चिखली) येथील ३५ गावकऱ्यांविरुद्ध अमडापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मृतदेहाची अवहेलना केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर : पिझ्झा, नुडल्स आणि मंच्युरियन खाल्ल्यामुळे वडिलांनी मुलीवर आरडाओरड केली. वडिलांच्या बोलण्याचा राग आल्यामुळे एकुलत्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना प्रतापनगर हद्दीतील खामला येथे घडली.
नागपूर : फेसबुकवरून झालेल्या मैत्रीतून शिक्षिकेने युवकावर विश्वास ठेवला. त्याला मित्र समजून त्याच्यासोबत एका नोकरीच्या मुलाखतीला गेली. मात्र, त्याने विश्वासाचा गैरफायदा घेत शिक्षिकेच्या शितपेयात गुंगीकारक औषधी मिसळून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शुद्धीवर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी मित्राविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
अप्रतिम! अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेला व्हिडीओ मुख्य कलाकार अर्थातच "नॉटी राऊत" - संदीप देशपांडे</p>
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1770253072226287625
पुणे : मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे मागासलेपण तपासण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागांत आठ दिवस घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. तालुका, नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपातळीवर सर्वेक्षण करण्यासाठी महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, ग्रामपातळीवर जिल्हा परिषदेचे शिक्षक, कर्मचारी अशा दहा हजार ६२८ कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले.