Mumbai Maharashtra News Update : महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर सांगली आणि मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. विश्वाजीत कदम यांनी सांगलीच्या जागेचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे, तर मुंबईतील जागावाटपावरून वर्षा गायकडवाड यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
याशिवाय काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेड येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. यावरूनही आज राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…
Maharashtra Breaking News Updates 12 April 2024 : महायुतीत दोन जागांचा तिढा अद्याप कायम; रत्नागिरी-सिंधुदुर्ग, साताऱ्यासह ११ मतदारसंघांत आजपासून निवडणूक प्रक्रिया
वसई : महिला तिकिट तपासनिसाबरोबर झालेल्या वादातून एका महिला प्रवाशाने चक्क तिकिट तपासनिसाच्या हाताचा जोरात चावा घेतला आहे. गुरूवारी संध्याकाळी वसई रोड रेल्वे स्थानकात ही घटना घडली. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी ३२ वर्षीय महिला प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे : सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे रक्ताचे नाते आहे. सुप्रिया सुळे यांना राजकीय फायदा घ्यायचाच असता तर, त्यांनी सुप्रिया पवार-सुळे असे नाव लावले असते, असे प्रतिउत्तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. तसेच लोकसभा निवडणुका या कर्तत्वावर लढविल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ठाणे : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्याचा कारभार हाकत असल्याने २००९ मध्ये ठाणे लोकसभा लढविण्याची सूचना केली होती. पंरतु एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला होता, ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली. तिथे उमेदवार जाहीर होत नव्हता असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला.
कल्याण : आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांनी आपल्यावर अंबरनाथ येथे आपल्या बोलण्यावरून टीका केली असली तरी, तो त्यांचा दोष नाही. ज्या पक्षाचा बॉस नकला करणारा असतो, त्याप्रमाणे त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही नकलाच करणारे असतात.
खरेदीदाराला घराचा ताबा उशिरा मिळाल्यास तो विकासकाकडे व्याजाची मागणी करू शकतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडे दिला आहे.
सोलापूर : वीरशैव लिंगायत समाजाचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्याचा मुद्दा यंदा सोलापूर लोकसभा निवडणुकीत ऐरणीवर आला आहे. या प्रश्नावर कारखान्याचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडल्याचा बदला घेऊन भाजपला धडा शिकविण्याची हाक कारखान्याच्या २७ हजार सभासद शेतकऱ्यांना दिली आहे.
सांगली : मविआमधून सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही याच्या निषेधार्थ शुक्रवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मिरज तालुका काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर फलकावरील जिल्हा काँग्रेस समितीच्या नावातील काँग्रेस हा शब्द पुसण्यात आला.
अध्वर्यू धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडल्याचा बदला घेऊन भाजपला धडा शिकविण्याची हाक कारखान्याच्या २७ हजार सभासद शेतकऱ्यांना दिली आहे.
तीनही पक्षांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, असे मत भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केले.
त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मुंबईहून त्या थेट आपल्या गावी रिसोड येथे पोहोचल्या.
पुणे : मध्यभागातील एका नामांकित शाळेत नववीतील मुलाला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची चित्रफीत प्रसारित झाली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरएफओ विवेक येवतकर यांनी वन्यजीव अधिनियमांना पायदळी तुडवत अभयारण्यातील कोअर झोनमध्ये स्वत:च्या खासगी वाहनाने प्रवेश केला.
मुंबई : अमर महल – सांताक्रूझ, पश्चिम द्रुतगती मार्ग असा थेट सिग्नलमुक्त आणि अतिवेगवान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आता जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पातील वाकोला नाला – पानबाई इंटरनॅशनल स्कूल उन्नत रस्त्याचे काम एप्रिलमध्ये पूर्ण होईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जाहीर केले होते.
मुंबई : पालक आणि मुलांमधील मालमत्तेच्या वादात विशेषत: पालकांच्या स्थावर मालमत्तेमध्ये वाटा नाकारलेल्या मुलांकडून पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण कायद्याचा गैरवापर होत असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने केली.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. उन्हामध्ये सतत काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो.
मुंबई : राज्य सरकारने हाफकिनला आणखी १६ औषधांची निर्मिती करण्याची परवानगी दिली आहे. परिणामी, हाफकिन निर्मिती करीत असलेल्या औषधांची संख्या २५ हून अधिक होणार आहे.
हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळ निर्मिती करीत असलेल्या सर्पदंश, विंचूदंश आणि पोलिओवरील लस, खोकला व तापावरील औषध यांना जगभरामधून मागणी आहे. त्यामुळेच हाफकिनने २०२३ मध्ये २०४ कोटी रुपयांच्या औषधांची विक्रमी विक्री केली होती.
पुणे : ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, असा संदेश देत बहुजनांना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची छबी आणि स्वाक्षरी आता लेखणीवर आली आहे.
गडचिरोली लोकसभेचे भाजप उमेदवार खासदार अशोक नेते यांचे दहा वर्षातील एक विकास काम दाखवा आणि बक्षिस मिळवा असे आवाहन विरोधी पक्ष नेेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
पुणे : डेक्कन जिमखाना परिसरात नदीपात्रात १६ वर्षीय शाळकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याची विवस्त्रावस्थेतील चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रोशन बन्सोड हा ११ एप्रिलच्या संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वडधामनातील सारंग बार जवळून पायी रस्ता ओलांडत होता.
नाशिक – दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने १९८६ मधील महाराष्ट्र केसरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील पहिलवान गुलाब बर्डे यांना रिंगणात उतरवले आहे. यानिमित्ताने वंचित आघाडीने दुर्लक्षित भिल्ल समाजाला प्रथमच उमेदवारी देत न्याय दिल्याची भावना बर्डे यांनी व्यक्त केली.
येत्या १५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय नरेंद्र मोदी आणि अमित शाह याच्या कोणत्याही सभेला महत्त्व राहत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
एखादी बस ५-७ मिनिटांत येणार असेल आणि नेमके त्याच वेळेस बेस्ट वा अन्य शहर वाहतूक बस आल्या तर प्रवासी त्या बसने जाण्याचे टाळत होते.
मुंबई : ठाण्यातील माजिवडे येथील वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्यामुळे रखडला आहे. हा प्रकल्प व्यवहार्य ठरावा आणि तो मार्गी लागावा म्हणून म्हाडा प्राधिकरणाने आपल्या हिश्शातील भूखंडावर अतिरिक्त घरे बांधण्याऐवजी उपलब्ध भूखंडाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोकण मंडळाने दोन भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा मागविली आहे.
उरणमधील वाढत्या नागरी व औद्याोगिकीकरणामुळे लोकसंख्या आणि वाहनांतही अनेक पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघातांतही वाढ झाली आहे.
मुंबईः आंबोली पोलिसांनी विकासक जयेश तन्ना (५६) विरोधात नुकताच फसवणुकीचा आणखी एक गुन्ह दाखल केला आहे. जयेश तन्ना विरोधात दाखल झालेला हा १३ वा गुन्हा आहे. या प्रकरणात तन्ना आणि त्याच्या कुटुंबीयांवर अंधेरी (पश्चिम) येथील एका व्यावसायिकाला तीन दुकाने विकण्याच्या नावाखाली त्याची तीन कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तन्नासह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईः परळ येथे दुचाकीला दिलेल्या धडकेत पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. यावेळी दुचाकीवर बसलेला दुसरा तरूणही गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळ निर्मिती करीत असलेल्या सर्पदंश, विंचूदंश आणि पोलिओवरील लस, खोकला व तापावरील औषध यांना जगभरामधून मागणी आहे.
मुंबई : बारामती, रायगड, कोल्हापूरसह ११ मतदारसंघांमधील मतदानाची अधिसूचना आज, शुक्रवारी जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज आज, शुक्रवारपासून दाखल करण्यात येणार असले तरी महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजप की शिंदे गट लढवणार याचा निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर साताऱ्यातही भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.