गेल्या वर्षभराहून अधिक काळ देशासह जगावर असलेलं करोना महामारीचं संकट आणि राज्यात दरवर्षी निर्माण होणारी पूरस्थिती या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आता एक अजब तर्क लावल्याचं पाहायला मिळत आहे. विश्वजित कदम याबाबत बोलताना म्हणाले कि, “परमेश्वराने ठाम भूमिका घेतली म्हणूनच कोरोना आला आणि पूर आला. परिणामी आपल्याला घरात बसावं लागलं.” ते शनिवारी (२१ ऑगस्ट) सांगलीत पार पडलेल्या पूर परिषदेत बोलत होते. दरम्यान, विश्वजित कदम यांनी केलेल्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सांगलीत झालेल्या पूर परिषदेत बोलताना विश्वजित कदम असं म्हणाले कि, “परमेश्वराने ठाम भूमिका घेत आपल्याला ही शिक्षा दिली आहे. कारण पिढ्यानपिढ्या आपण फक्त शोषण आणि प्रदूषणच केलं. अनेक खून, चोऱ्या झाल्या. त्यामुळे अखेर परमेश्वराने ठाम भूमिका घेतली आणि कोरोना आला. त्याने आपल्याला घरात बसवलं. त्यानंतर पूर आला. या सगळ्याचा जबरदस्त फटका आपल्या सर्वांनाच बसला आहे. पण आता यावर उपाययोजना करून या समस्या सोडवण्याच्या दिशेने पावलं टाकणं आवश्यक आहे.” दरम्यान, यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील देखील उपस्थित होते.

Pune potholes, Pune Municipal Commissioner,
पुणे : खबरदार… खड्डे न बुजविणाऱ्या मंडळांना आयुक्तांचा इशारा
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
wfi president sanjay singh comment on vinesh phogat
विनेशने कुस्तीत राजकारण करू नये!‘डब्ल्यूएफआय’चे अध्यक्ष संजय सिंह यांची टिप्पणी
Triple Talaq case in UP
Triple Talaq to Wife: पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांची स्तुती केल्यामुळे दिला तिहेरी तलाक
Badlapur Protests Majority of Arrested Protesters Confirmed as Local Residents
बदलापूर आंदोलनातील आंदोलक ‘बदलापूरकरच’; आंदोलनातल्या २५ अटक आरोपींपैकी २३ जण ‘बदलापूरकर’
Shiv Sena Shinde faction city chief has filed a case of abusive language used against a woman journalist
शिवसेना शहर प्रमुखावर गुन्हा दाखल; महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याने वाद
Ajit Pawar, Ladki bahin yojna, Ravi Rana,
काही ‘महाभाग’ योजनेचे पैसे परत घेण्याचे वक्तव्य करतात, अजित पवारांची आमदार रवी राणांवर टीका
Kolkata Rape Case
Kolkata Rape Case : “पोलीस आमच्यापेक्षाही वेगाने पळून गेले”, कोलकात्यातील रुग्णालयात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी परिचारिकांची संतप्त प्रतिक्रिया!

निसर्गाशी आपण फार मोठा खेळ केलाय!

जयंत पाटील यांनी देखील सांगलीत वारंवार निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले कि, “पूर येणे हा काही विषय राजकीय नाही. निसर्गाशी आपण फार मोठा खेळ केला आहे. माणसाकडून वारंवार अतिक्रमण करण्यात आलं आहे. त्यामुळे, निसर्गाने हे रूप धारण केलं आहे. सांगली शहरात बिबट्या, मगरी येऊ लागल्या आहेत. हा फार गंभीर प्रश्न आहे. मानवाच्या अनेक चुका झाल्या आहेत. त्याचे दूरगामी परिणाम सोसावे लागणार आहेत.”

…तर आपण काहीच करू शकत नाही!

पुढे बोलताना जयंत पाटील असंही म्हणाले कि, “एका निश्चित मर्यादेपेक्षा जास्त पाऊस पडला तर आपण काहीच करू शकत नाही. याचा अनुभव आम्हाला मागच्या वेळी धरणाच्या मागे पाऊस पडला त्यावेळी आला. त्यावेळी जिवंत जनावरं वाहून गेल्याचं पाहून डोळ्यात पाणी आलं होतं. आपण पडणारा पाऊस आणि धरणात येणार पाऊस याचा ताळमेळ लावू शकतो. पण यावेळी पडणाऱ्या पावसाचा ताळमेळ घालता आला नाही. म्हणूनच मी अनेकांना गावं सोडायला सांगितलं. त्यामुळे जीवितहानी झाली. प्रचंड पाऊस पडतो तेव्हा काहीच पर्याय नसतो. जेवढं पाणी खाली जाईल तेवढं चांगलं. आमचं कर्नाटक सरकारशी बोलणं झालं. त्यांनी देखील सहकार्य केलं.”