पुणे : नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर, काँग्रेस पक्षाने सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाई केली होती. तरीदेखील पदवीधर मतदारसंघातून प्रचंड मतांनी सत्यजीत तांबे हे निवडून आले होते. या निवडणुकीला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी होऊन गेला. त्यादरम्यान राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या, पण सत्यजित तांबे नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अद्यापही निश्चित झाले नाही. या राजकीय घडामोडीदरम्यान सत्यजीत तांबे पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस प्रवेशावर भाष्य केले आहे.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महापालिकेतील आढावा बैठकीकडे शिवसेना खासदार, भाजपा आमदारांची पाठ

thorat
फुटीर आमदारांवर कारवाई; काँग्रेसने नावे जाहीर करण्याचे टाळले
mamata banerjee on samvidhaan hatya diwas
संविधान हत्या दिन: अमित शाहांच्या घोषणेबाबत प्रश्न विचारताच ममता बॅनर्जी काही क्षण थांबल्या, नंतर म्हणाल्या…
Case, Special Public Prosecutor,
माजी आमदाराच्या तक्रारीवरून विशेष सरकारी अभियोक्त्याविरोधात गुन्हा, १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप
sangli congress mla Vikram sawant
सांगली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची कृती त्यांनाच अडचणीची ठरणार ?
Keir Starmer
ब्रिटनमध्ये मजूर पक्षाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार… कीर स्टार्मर!
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
Criticism of Prime Minister Narendra Modi Injustice to the underprivileged by Congress
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका; काँग्रेसकडून वंचितांवर अन्याय
Controversy, Shukre commission,
शुक्रे आयोगाला प्रतिवादी करायचे की नाही यावरून वाद, मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांतच मतभेद

हेही वाचा – अजित पवारांचे स्वागत करतांना ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर; बुलेट चालक सुस्साट

काँग्रेस पक्षात जाणार का असे विचारले असता तांबे म्हणाले की, काँग्रेसमधील काही ठराविक लोकांनी मला लक्ष्य करून बाहेर काढले. आमच्या रक्तात आणि विचारात काँग्रेस आहे. मला पक्षातून काही लोकांनी बाहेर ढकलून दिले असले तरी आता पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की, मला त्यांनी परत बोलावलं पाहिजे. पण अद्यापपर्यंत अशी कुठलीही हालचाल झालेली नाही. निवडणुकीच्या काळात जो काही एपिसोड झाला तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, कशा पद्धतीने माझ्याबरोबर राजकारण झाले आणि कशा पद्धतीने पक्षातून बाहेर ढकलण्यात आले, मी काही एकटाच नाही, तर देशात माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांना नेत्याकडून ठरविक ठिकाणी टार्गेट करून ढकलण्यात येत आहे. ही चिंतेची बाब असून यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे असल्याची भूमिका मांडत सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस पक्षात परतण्याचे संकेत दिले आहेत.