Maharashtra News Update : नाशिकमध्ये शिवसेनेचं ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. दुसरीकडे, मनोज जरांगे-पाटील यांचा पायी मोर्चा पुणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. यासह महाराष्ट्रातील राजकीय, क्राइम आणि विविध घडामोडी जाणून घेणार आहोत….
Maharashtra News Live Today 23 January 2024 : महाराष्ट्रातील विविध घडामोडी एका क्लिकवर...
अकलूजमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या बंगल्यात चोरीच्या हेतूने शिरल्याच्या संशयावरून बेदम मारहाण झालेल्या एका तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह आठजणांविरूध्द अकलूज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वाचा…
मिरा रोड येथील नया नगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर मंगळवारी पालिकेने कारवाई सुरू केली आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालिकेनेही ही नियमित कारवाई असल्याचे सांगितले आहे. सविस्तर वाचा…
सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक विद्यार्थी धडपड करत असतो. अशात नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण यामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेल्या मुलीला चक्क २१४ गुण मिळाले आहेत. सविस्तर वाचा
ओबीसींसह इतर कोणत्याही आरक्षणाला हात न लावता सकल मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण द्यावे, केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार संहिता व महाराष्ट्र सरकारने कंत्राटी तत्वावर कर्मचारी भरतीसाठी काढलेली अधिसूचना रद्द करून सरकारी सेवेत कायमस्वरुपी नोकरीसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरती करावी सविस्तर वाचा
जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेससंदर्भात मोठी माहिती वर्षभरानंतर समोर आली आहे.
आम्ही महायुतीत सहभागी असलो तरी सहभागी सर्वच पक्षांची आपली स्वतंत्र विचारधारा आहे, असे नायकवाडी यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील सरकारच्या दारात येऊ लागताच सामाजिक सर्वेक्षणाचे सरकारने आदेश देणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
लोणावळ्यातील कार्ला येथे पितापुत्राच्या जोडीने मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहूब मेणाचा पुतळा साकारला आहे.
पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात सोमवारी दर्शनासाठी रामभक्तांमुळे झालेल्या गर्दीचा फायदा घेत संशयित महिलेने चोरलेले बाळ पोलिसांच्या तत्परतेने तीन ते चार तासांच्या आत परत मिळाले. या प्रकरणात एका भिकारी महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमची मालकी असताना आम्हाला न विचारता व्यापारी गाळा का उघडला, असा प्रश्न करून डोंबिवली पू्र्वेतील पी ॲन्ड टी कॉलनी येथे पाच जणांनी भाजपच्या एक महिला पदाधिकारी आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत आरोपींनी महिलेचा विनयभंग केला.
प्रेमविवाहास सर्वाधिक उत्सूकता तरुणीकडूनच दाखवल्या जाते. अनेक प्रकरणांमध्ये प्रियकर प्रेमविवाहास टाळाटाळ करतो तर युवती थेट घरातून पळून जाऊन लग्न करण्याची तयारी दर्शवते.
"प्रभू श्री राम एकवचनी होते. पण, आशिष शेलार यांचा नेता ७२ तासांच्या आतमध्ये ७० हजार कोटींचा आरोप कोणावर केला? नंतर परत त्या नेत्याला बरोबर घेतात. हे कसले एकवचनी आहेत?" असा सवाल उपस्थित करत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे.
नागपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कोठडीत बंद असताना गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याचे लगेच लक्ष गेल्यामुळे दुर्घटना टळली.
नंदनवन पोलिसांनी दोन गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि ७ काडतूस जप्त केले.
मुंबई महानगरपालिकेने कर्मचारी, अभियंत्यांबरोबरच सफाई कामगारांनाही मराठा सर्वेक्षणाच्या कामाची जबाबदारी सोपविली असून निरक्षर असलेल्या तमिळ भाषिक सफाई कामगारांची या कामासाठी नियुक्ती होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये युवा मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्याची सुधारित मतदार यादी जाहीर केली.
डोंबिवली जवळील दावडी गावातील एका विकासकाची नऊ वर्षापूर्वी पैशाच्या वादातून चार जणांनी हत्या केली होती. या प्रकरणातील चार जणांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी. आर. अस्तुरकर यांनी जन्मठेपेची आणि १४ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सविस्तर वाचा…
राज्याच्या कोणत्याही भागातून पृथ्वीराज चव्हाण हे निवडणुकीसाठी उभे राहिल्यास ते निवडून येतील, असा विश्वास देखील काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी चेन्नीथला यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठा आरक्षण आता अंतिम टप्प्यात असून या लढाईसाठी सर्वांनी मोठ्या संख्येने मुंबईत यावे आणि मराठा समाजाने आपल्यातील एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन मराठा आरक्षण क्रांती योद्धे मनोज जरांगे यांनी मंगळवारी केले. सविस्तर वाचा
"महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नेत्यांशी माझी चर्चा सुरू आहे. पण, वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे," असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
बारावे गावातील एका तरूणाने प्रभू रामचंद्रांवर तयार करण्यात आलेल्या गाण्यात छेडछाड करून त्यामध्ये दोन समाजात धार्मिक तेढ-तणाव निर्माण होईल असे शब्द टाकले.
"महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नेत्यांशी माझी चर्चा सुरू आहे. पण, वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे," असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
श्रीराम मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
पुण्यात पोलिसांना शरण आलेला नक्षलवादी संतोष शेलार उर्फ पेंटर दोन वर्षांपूर्वी चकमकीत ठार झालेला नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे याचा अंगरक्षक होता.
पुणे : शहरात तीन ठिकाणी आग लागण्याची घटना घडली. लष्कर भागातील मॉडर्न डेअरीत सोमवारी रात्री आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. पाण्याचा मारा करून वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली.
वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक लागून तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, तर श्री राम मंदिर उभे राहिले नसते. मोदी आज अयोध्येला गेले, त्याआधी गेले नव्हते," अशी टीका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाशिकमधील अधिवेशनात केली आहे.
पुणे : काँग्रेसमधील वाढती अंतर्गत गटबाजी, रुसवे आणि फुगव्यांसह आपापसातील मतभेद आगामी लोकसभा निवडणुकीत घातक ठरण्याची शक्यता असल्याने शहर पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनासाठी आयोजित करण्यात आलेले मंगळवारचे स्नेहभोजन रद्द करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
जवळपास दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिला. यामध्ये त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. तसेच, शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांनाच वैध ठरवत त्यांच्याविरोधातील याचिका फेटाळल्या. यानंतर ठाकरे गटानं थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने आता राहुल नार्वेकरांच्या नावे नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.<br />