Mumbai Maharashtra News Update : महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर सांगली आणि मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. विश्वाजीत कदम यांनी सांगलीच्या जागेचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे, तर मुंबईतील जागावाटपावरून वर्षा गायकडवाड यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. याशिवाय काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेड येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. यावरूनही आज राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…